चार चौकतीट मन आम्ही रमवीले,
या सुंदर निसर्गाशी नाती आम्ही तोडीले,
लगोरीच्या चेंडू पेक्षा,
टीव्हीचा रिमोट हातात हवा,
खेळतांना भांडण्याचा,
विसरलोच आम्ही गोडवा;
विसरलोच आम्ही फ़ुलांचा सुगंध,
परफ्युम आणि ङिओच्या नादात,
तो मनमोहक गंध नाहीतर,
फक्त रसायन आमच्या श्वासात;
लोकांची खरी नावे काय हे,
लक्षातच नाही आमच्या,
कारण फेसबुक आणि व्हाट्सअपॅ वर टोपण नावे ठेवून,
आम्ही स्वता: च घालवली त्यातील मजा;
आता स्वप्नातही,
अप्सरा आणि भूतं येत नसतात,
कारण आजचं सोडून भविष्यात कसं जगायचं,
हाच एफ विचार सतत आमच्या डोक्यात;
सगळं आता घरपोच असतं,
सगळं त्यांनी निवळलेलं असतं,
पण बाजारात जाऊन स्वतः निवळायाची,
विसरलीच की हातं;
मोठमोठी इमारती आम्ही जरी उभारले,
स्वतःचा सोयी प्रमाणे जग आम्ही बनवीले,
सोयींमध्ये रमतांना मात्र,
या सुंदर निसर्गाशी नाती आम्ही तोडीले
-AEM KAY
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem